!! शब्द टाकला मागे न घ्यावा , "मराठा" म्हणावे अशा वाघराला !!
!! मराठे!!
.... आमचे दैवत ....
"मराठ्यांचा" स्वराज्य विस्तार
भगव्या रंगाने रेखांकित कलेला प्रदेश
"मराठा" साम्राज्य आहे.
१६७४ - १८२०
राजधानी - रायगड , पुणे .
राजे : भोसले घराणे
१६७४ - १६८० : शिवाजी
१६८१ - १६८९ : संभाजी
१६८९ - १७०० : राजाराम
१७०० - १७०७ : ताराबाई
१७०७ - १७४७ : शाहूजी
पेशवे
१७१३ - १७१९ : बाळाजी विश्वनाथ
१७१९ - १७४० : थोरले बाजीराव
१७४० - १७६१ : बाळाजी बाजीराव
१७६१ - १७७२ : माधवराव
१७७२ - १७७३ : नारायणराव
१७७३ - १७७४ : रघुनाथराव पेशवे
१७७४ - १७९५ : सवाई माधवराव
१७९५ - १८१८ : धाकटे बाजीराव
भाषा - मराठी
क्षेत्रफळ सुमारे -१,००,००० वर्ग किमी वर्ग किमी
चलने - होन , मुद्रा , रुपया, पैसा
!! मराठा साम्राज्य !!
- मराठा साम्राज्य इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ पर्यंत भारतात अस्तित्त्वात असलेले हिंदू राज्य होते . याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता . हे साम्राज्य शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले . शिवाजींनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबाविरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला . इ.स. १६८० मधील शिवाजींच्या मृत्यूनंतर काही काळ अस्थैर्य माजले जे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपले . यानंतर शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी प्रधानमंत्री असलेल्या पेशव्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी पानिपतच्या तिसर्या लढाईत अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला . अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव आंग्लांबरोबरील तिसर्या लढाईत पराभूत झाला .
- गनिमी कावा , डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या मलुखावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता . या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली . दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता . मराठी आरमाराने पोर्तुगीझ व ब्रिटिश आरमारांना शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनार्यांकडून शिरकाव करता आला नाही . कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते .
शिवाजीमहाराजांचा शासनकाल
- देशावर पुण्याजवळ राहणार्या हिंदू मराठ्यांनीमुघलांनाया भागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांनी शिवाजीच्या नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या मुस्लिम सुलतानांपासून स्वतत्र करून घेतले . यानंतर ते अधिक आक्रमक झाले व उत्तरेमध्ये बर्याच चढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला . इ.स. १६७४मध्ये शिवाजीला राजा घोषित करण्यात आले . शिवाजीच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी संपूर्ण मध्य भारत काबीज केला होता.
शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी
- १६८१ मध्ये महाराजांचे मुलगा संभाजी राजा बनला आणि त्याने वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली. राजपुत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या सार्या राजदरबाराला आणि १,८०,००० सैन्याला घेऊन दक्षिणेला आला. त्याने विजापूर आणि गोवळकोंडा हया सल्तनती जिंकून घेतल्या. १६८८ मध्ये संभाजी पकडला गेला. त्याचा प्रचंड शारीरिक छळ करण्यात आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
- संभाजीचा बंधू राजाराम हा नंतर राजा बनला. १७०० मध्ये सातारला मुघलांचा वेढा पडला आणि मुघलांनी ते काबिज केले. याच काळात राजारामाचा सिंहगडावर मृत्यू झाला आणि त्याची पत्नी ताराबाई हीने त्यांचा मुलगा संभाजी दुसरा याच्या नावाने राज्यकारभार हातात घेतला. तिने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला पण बादशाह तयार झाला नाही. त्याच वर्षी मराठे नर्मदेच्या पार पोचले. माळव्याच्या मराठ्यांनी केलेला नवीन हल्ला आणि हैद्राबादमध्ये केलेली लूट यामुळे बादशाह वैतागला. दोन दशके चाललेले दक्षिणेचे युद्ध त्याच्या खजिन्यावर ताण देत होते. १७०५ मध्ये औरंगजेब आजारी पडला आणि दोन वर्षांनी मरण पावला.
- बादशहाच्या मृत्यूनंतर शाहूजी जो संभाजीचा पुत्र(शिवाजीचा नातू) होता त्याला बहादुरशाहने सोडले. यानंतर थोडा काळ अराजकता माजली. शेवटी मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे याची मदत घेऊन शाहूजीने निर्विवाद मराठा नेतृत्व मिळविले. बाळाजी आता पेशवा बनला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मुघलांबरोबरची लढाई संपुष्टात आली. यानंतर मुघल साम्राज्य कधीच उभारू शकले नाही आणि मराठा साम्राज्य भारतातील सर्वांत शक्तिशाली राज्य बनले.
- १७१३ मध्ये फारूख्सियार मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे सय्यद बंधू म्हणून ओळखले जात होते. ते अलाहाबाद आणि पटणा येथील राज्यपाल होते. पण बादशही बरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत सामिल झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि गुजरात, माळवा इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.
- ते १७३५ मध्ये राजस्थानात, १७३७ मध्ये दिल्ली आणि १७४० मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य अजुनी सैल पद्धतीनेच बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालिल भागांची विभागणी ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, माळव्याचे होळकरनागपूर ही तिची राजधानी बनली.
- बाजीराव १७४० मध्ये वारला . शाहूजीने त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले . याच वेळी त्याचा भाऊ रघुनाथराव राज्य विस्तार करत पंजाबपर्यंत पोचला. १७६० मध्ये निजामाच्या पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले.
मराठ्यांचे राज्यकर्ते
शिवाजींचे राजघराणे
- छत्रपती %A